Chanakya Niti: आचार्य चाणक्य एक महान कूटनीतिज्ञ, अर्थशास्त्री आणि राजनीतिज्ञ होते. तेवढेच नाही तर ते महान शिक्षक पण होते. त्यांनी आपल्या धोरणाच्या आधारावर एका साधारण मुलाला चंद्रगुप्तला सम्राट बनवले. त्यांनी सांगितलेल्या धोरणाच पालन युवा आज पण जीवनात यश मिळण्यासाठी करतात.
नीति शास्त्रमध्ये आचार्य चाणक्यांनी जवळपास सगळयाच क्षेत्र संबंधित माहितीचा उल्लेख केला आहे. त्याच नीति शास्त्रमध्ये काही असा लोका बध्दल पण उल्लेख केला आहे. जे व्यक्तीच्या दुःखाला समजु शकत नाही. चला पाहूया कोण ती माणसं.

चोर
आचार्य चाणक्यांच्या मतानुसार चोर कोणत्याच व्यक्तीच दुःख आणि त्रास समजु शकत नाही. त्यांचा फक्त चोरी हाच स्वार्थ असतो. तो हा विचार करत नाही कि कोणाच्या घरी चोरी केल्याने त्या माणसाचं किती नुकसान होते. तो फक्त चोरी करण्यावर लक्ष देतो.
हे पण वाचा: मित्र बनवण्याआधी ओळखून घ्या या गोष्टी नाही, तर नंतर पश्चताप होईल
स्वार्थी लोक
आचार्य चाणक्यांच्या मतानुसार स्वार्थी लोक फक्त आपल्या फायद्या बद्दल विचार करतात. असे लोक आपल्या स्वार्था पुढे कोणाच्या दुःखाचा आणि त्रासाचा विचार करत नाही, असा लोकांशी नेहमी लांब रहा.
व्यसनी व्यक्ती
आचार्य चाणक्यांच्या मतानुसार असा लोकांशी लांब राहिले पाहिजे. ज्यांना नशा करण्याची लत लागलेली असते. असे लोक नशा करण्यासाठी कोणती पण मर्यादा पार करू शकतो. मोठा गुन्हा पण करू शकतो. व्यसना पुढे हे कोणालाच काही समजत नाही. या लोकांसोबत राहुन तुम्हाला पण नशा करण्याचे व्यसन लागु शकते.
वेश्या
वेश्याला पण फक्त आपल्या पैशाशी प्रेम असते त्यांना कोणाच्या दुःखाशी आणि त्रासाशी काही फरक पडत नाही.