Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक महान तत्वज्ञानी होते. त्यांनी अर्थशास्त्र, राजनीति, कूटनीति जीवनामध्ये जोडलेल्या भरपूर काही गोष्टी सांगितल्या आहे. आचार्य चाणक्यांनी नीती शास्त्राची रचना केली आहे. त्यांनी नितीशास्त्रामध्ये प्रत्येक क्षेत्राशी जोडलेल्या गोष्टीचा उल्लेख केला आहे.

या गोष्टीचा पालन करुण व्यक्ती आपल्या जीवनामध्ये यश मिळवू शकतो. ही धोरणे खूप लोकप्रिय आहेत. लोक आजपण जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी या धोरणाचे पालन करतात. आचार्य चाणक्यांनी नीती शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्याआहे कि त्या माणसाच्या जीवनात समस्या निर्माण करू शकता.
ऋणकर्ता पिता शत्रुर्माता च व्यभिचारिणी
भार्या रूपवती शत्रु: पुत्र: शत्रुरपण्डित:
कर्ज
आचार्य चाणक्याच्या मतानुसार वडील जर कर्ज घेत आहे तर कोणत्या शत्रूपेक्षा कमी नाही आहे. वडिलांचे कर्तव्य आहे कि ते आपल्या मुलांचे पालनपोषण चांगल्या प्रकारे करावे. वडिलांनी कर्ज घेतले असेल आणि जर वडील ते फेडू शकले नाही मुलाला ते फेडावे लागते. त्यामुळे अशा वडिलांना मुले आपले शत्रू समजतात. त्यामुळे मुले आपल्या वडिलांना वाईट बोलतात.
Chanakya Niti: वैवाहिक जीवनात विषाचे काम करतात या गोष्टी, नेहमी ठेवले पाहिजे विशेष लक्ष
भेदभाव
आचार्य चाणक्याचा यांच्यामते जी आई आपल्या मुलांमध्ये भेदभाव करते, ती आपल्या मुलाचं नाते एकमेकांशी खराब करू शकते. परिणामी त्यामुळे परिवाराचे नाते खराब होऊ शकते, अशी आई आपल्या मुलांच्या नजरेत शत्रू होऊ शकते.
पत्नीनेचे सौंदर्य
आचार्य चाणक्य यांच्यानुसार पत्नीचे सौंदर्य पतीसाठी त्रासाचे कारण बनू शकते. जी स्त्री आपल्या पतीचा सम्मान करत नाही आणि दुसऱ्या माणसा सोबत संबंध ठेवते अशी पत्नी अपमानाचे कारण बनू शकते.
मूर्ख मुले
आचार्य चाणक्या यांच्या मतानुसार ज्या मुलांची अक्कल कमी असते, अशी मुले आई वडिलांसाठी कोणत्या शत्रू पेक्षा कमी नसतात. अशी मुलं आई वडिलांवर अवलंबून असतात, अशी मुले भविष्यात नुकसान पोहचू शकते.