Breaking News

Chanakya Niti: हे अवगुण स्वतःपासून ठेवा दूर, नाही तर जीवन होईल नरक

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक अतिशय प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, नीतिशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्याचा सल्ला आजही खूप उपयुक्त आहे आणि तुम्हाला येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करू शकते. त्याच्या सल्ल्याचे अनुसरण केल्याने जीवन खूप सोपे होईल आणि आपण आपल्या सर्व त्रासांपासून त्वरीत मुक्त होऊ शकाल.

आचार्य चाणक्य यांनी प्राचीन भारतीय ग्रंथ निती शास्त्रामध्ये नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंधांबद्दल भरपूर सल्ला दिला आहे. त्याने काही गोष्टींचा उल्लेख केला ज्यामुळे जीवन कठीण होऊ शकते, जसे की वाईट सवयी किंवा लोकांमध्ये असलेले दोष. परंतु या सर्व समस्या असूनही, त्यांचे निराकरण केले जाऊ शकते. हे दोष कोणते आहेत ते जाणून घेऊया.

Chanakya Niti
Chanakya Niti: हे अवगुण स्वतःपासून ठेवा दूर, नाही तर जीवन होईल नरक

करुणेचा अभाव:

आचार्य चाणक्य यांच्या अनुसार ज्या व्यक्तीमध्ये दया भाव नसतो, ती व्यक्ती जीवनात कधी हि काही काही प्राप्त करू शकत नाही. जीवनात यशस्वी होण्यसाठीच दया भाव असणे जरुरी आहे.

हे वाचा : अशा महिलांना ज्या व्यक्तींच्या जीवनसाथी असतात, त्यांचे आयुष्य सुधारण्यास वेळ लागत नाही

सन्मान न करणे:

जेवढा सन्मान तुम्ही दुसऱ्याचा करता तेवढाच तुम्हाला पण सन्मान पण मिळत असतो. ह्यासाठीच तुम्ही समोरच्या माणसाला सन्मान द्या, दुसऱ्याला सन्मान दिल्याने कोणी छोटा किंवा मोठा होत नाही. परंतु कधी हि कोणत्याही कारणाने अपमान करू नये. तेव्हाच तुमचा समाजात सन्मान केला जातो.

क्रोध:

क्रोध हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू समजला जातो. व्यक्तीने नेहमी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे. क्रोध आपल्यावर व्यक्ती कसलाच विचार करू शकत नाही, त्याची विचार करण्याची क्षमता कमी होते. विनाकारण लोकांवर क्रोध करू नये. क्रोध करणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होऊ शकते.

दान-धर्म न करण्याची सवय:

दान धर्मा करण्यापासून व्यक्तीने कधी हि दूर राहू नये. दान केल्या शिवाय जीवन व्यर्थ आहे. नेहमी आपल्या उत्पन्नाचा काही भाग दान जरूर केला पाहिजे. जीवनात दान धर्म करण्याची सवय प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्यामुळे आपलं लोकांची काही प्रकारे मदत करतो. समाजचे आपण पण काही देणे लागतो हे लक्षात ठेवावे.

About Leena Jadhav