Breaking News

Chanakya Niti: या गोष्टींची काळजी न घेतल्याने नातेसंबंध बिघडू आणि तुटू शकते

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे त्यांच्या विविध विषयांवरील सुज्ञ धोरणे आणि विचारांसाठी ओळखले जातात. केवळ राजकारणच नव्हे तर प्रत्येक गोष्टीचे त्यांना भरपूर ज्ञान होते. समाजातील महत्त्वाच्या गोष्टींबाबतही त्यांचे धोरण होते, ज्यामुळे लोकांना माहिती राहण्यास आणि चांगले निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या एका नैतिक शिकवणीत पती-पत्नीमधील महत्त्वाच्या नात्याबद्दल सांगितले आहे. काही वेळा लोकांच्या कृतींमुळे या नात्याला हानी पोहोचते, असे त्यांनी सांगितले.

Chanakya Niti shastra
Chanakya Niti: पती-पत्नीमधील महत्त्वाच्या नात्याबद्दल सांगितले आहे.

या गोष्टी पती-पत्नी मधील नातेसंबंध नष्ट करतात

चाणक्ययांच्या नीतिशास्त्रानुसार पती-पत्नीचे नाते कमकुवत होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे अहंकार. त्यांच्या मते पती आणि पत्नीच्या नात्यात अहंकाराला कोणतेही स्थान नसले पाहिजे.

चाणक्याचे असे मानणे आहे कि, पती आणि पत्नीच्या नात्यात संशयाला कोणी जागा नसली पाहिजे. कारण संशय केल्याने नातेसंबंध बिघडतात परिणामी नाते तुटू शकते.

Chanakya Niti: पत्नीला संतुष्ट करण्यासाठी प्रत्येक पुरुषामध्ये असावेत कुत्र्याचे हे पाच गुण, जाणून घ्या कोणते आहेत ते गुण

जर एकदा नात्यात शंका आणि गैरसमज निर्माण झाले कि, नातेसंबंध तुटून जातात. ह्यासाठी पती-पत्नीने त्यांच्या नात्यात शंका निर्माण होईल असे काही करू नये. वेळीच सावध होऊन आपल्या नात्याची काळजी घ्यावी.

चाणक्याच्या मते खोट्या गोष्टींच्या मदतीने कोणतेच नाते चालू शकत नाही. जेव्हा नात्यात खोटेपणा येतो तेव्हा खाजगी जीवनात चिंता निर्माण होणे साहजिक आहे. त्यासाठी पती-पत्नीच्या मध्ये कसला हि खोटेपणा नसावा.

About Leena Jadhav