Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी वैवाहिक जीवनाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी खूप प्रभावी आहेत, म्हणून लोक त्यांचा त्यांच्या आयुष्यात नक्कीच वापर करतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार काही सामान्य चुका वैवाहिक जीवन खराब करू शकतात.

टोमणे मारना:
चाणक्यांच्या मते जीवनात समस्या येतात आणि जातात, परंतु काही समस्या जास्त त्रासदायक असतात ज्याच्या निर्माण होण्यामागे आपण स्वतःच जबाबदार असतो. आपल्या जीवनसाथीला छोट्या छोट्या गोष्टींवर टोमणे मारणे किंवा त्यांना घालूनपाडून बोलणे चुकीचे आहे. अशा वागण्यामुळे तुमच्या नात्यात मोठी समस्या निर्माण होईल.
बोलणं बंद :
वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत भांडण, वादविवाद हे होतच राहतात, परंतु रागाच्या भरात जोडीदारासोबत बोलणंच बंद केल्याने सवय लागू शकते आणि नात्यात अजून गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नात्यात दुरावा येईल.
सहयोग न करणे :
चाणक्य नीती सांगतात की वैवाहिक जीवनात पती-पत्नी दोघांचीही भूमिका महत्त्वाची असते. घरातील सर्व कामे एकाच व्यक्तीने केली तर शेवटी समस्या निर्माण होऊ शकतात. जीवनाची गाडी सुरळीत चालू ठेवण्यासाठी जोडीदार दोघांनी एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे.
कुटुंबावर टीका करणे :
विवाहित जोडप्यांनी एकमेकांच्या कुटुंबावर टीका करणे सामान्य आहे असे चाणक्य नीती मध्ये सांगितले आहे. परंतु आपण ज्यांच्या सोबत लहानपणापासून राहिलो त्यांच्या बद्दल जोडीदाराकडून टीका होत असल्याने मनात कटुता निर्माण होते.