Vastu Tips: वास्तुशास्त्रात लोकांच्या प्रगतीचे मार्ग सांगितले आहेत. समस्या सोडवण्याचा मार्गही सुचविण्यात आला आहे. अनेक वेळा लोकांना मेहनत करूनही त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होत नाही आणि कामाचे फळही चांगले मिळत नाही. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात निराशा सुरू होते. लोकांना त्यांच्या करिअरची चिंता वाटू लागते.
ज्योतिषांच्या मते, काही वेळा वास्तू दोषांमुळेही असे होऊ शकते. नोकरी शोधणाऱ्या आणि व्यावसायिकांसाठी वास्तुशास्त्रात काही अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने करिअरमध्ये प्रगती तर होतेच, पण कीर्तीही मिळते. चला, आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार प्रगती करण्याचे मार्ग सांगणार आहोत.
ऑफिसमध्ये असे बसा
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनी नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसण्याची विशेष काळजी घ्यावी. पश्चिम दिशेला तोंड करून बसता येते, पण दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये.
डेस्कवर हिरवी रोप ठेवा
तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुम्हाला आराम वाटण्यासाठी तुमच्या डेस्कवर एक रोप ठेवावे. परंतु ते जास्त कोरडे होणार नाही म्हणून नियमितपणे पाणी देण्याची खात्री करा.
Chanakya Niti: आचार्य चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मिळेल शत्रूंवर विजय
टेबलाखाली डस्टबीन ठेवू नका
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनी विशेष लक्ष द्यावे की कधीही त्यांच्या टेबलाखाली डस्टबिन ठेवू नका. जर ते तुमच्या टेबलाखाली ठेवले असेल तर ते ताबडतोब काढून टाका, परंतु जर तुम्हाला ते काढता येत नसेल तर दिवसातून एकदा तरी ते रिकामे करा, जेणेकरून त्यात कचरा राहणार नाही.
पक्ष्यांसाठी अन्न ठेवा
लोकांनी त्यांच्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी अन्न आणि पाणी ठेवले पाहिजे. असे केल्याने घरामध्ये सौभाग्य येते आणि करिअरमध्येही प्रगती होते.
वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या
ऑफिसला निघताना आई-वडिलांच्या पायाला हात लावायला विसरू नका. शास्त्र आणि पुराणानुसार आई-वडिलांचा आशीर्वाद सर्वात महत्वाचा मानला जातो. त्यामुळे त्याचा आपल्या सवयींमध्ये समावेश करा.
घरातून बाहेर पडताना पाणी प्या
जर तुम्ही ऑफिसच्या काही महत्त्वाच्या कामासाठी किंवा मुलाखतीसाठी निघत असाल तर थोडा गूळ खाऊन पाणी पिऊन घरातून बाहेर पडा. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे यशाची शक्यता वाढते.
Chanakya Niti: या प्रवृत्तीचे लोक दुसऱ्यांच्या स्वार्थीपणाचे बळी होतात
प्रार्थना करा
जर तुम्ही ऑफिसला किंवा बाहेर घाईत निघत असाल तर देवासमोर डोके टेकवा किंवा मनापासून प्रार्थना करा. त्यामुळे येणारे संकट टळेल आणि मनही शांत राहील.