Breaking News

Chanakya Niti : आचार्य चाणक्या यांनी सांगितलेल्या या 6 गोष्टी, नेहमी लक्षात ठेवाव्यात..

Chanakya Niti : आजही आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या आणि अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या सर्व धोरणांचे वाचन आणि ऐकले तर असे दिसते की त्यांनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट किती अचूक आहे. आचार्य चाणक्य ही अशी व्यक्ती होती ज्याने आपल्या धोरणांच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर चंद्रगुप्ताला सम्राट चंद्रगुप्त बनवले. त्यांची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रावरील पुस्तके ही त्या विषयांवर लिहिलेली अतिशय महत्त्वाची पुस्तके मानली जातात.

आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्याच्या त्या 6 गोष्टी सांगत आहोत ज्या कोणत्याही मनुष्याने आपल्या आयुष्यात लक्षात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी लक्षात ठेवल्यास तो आपल्या जीवनातील अनेक अडचणींवर मात करू शकतो.

Acharya Chanakya Niti
Chanakya Niti : आचार्य चाणक्या यांनी सांगितलेल्या या 6 गोष्टी, नेहमी लक्षात ठेवाव्यात..

भूतकाळ विसरा

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, जीवनात सुख शांती हवी असेल तर भूतकाळ विसरा. आयुष्यात पुढे जात राहण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. जुन्या चुकीच्या गोष्टी लक्षात ठेवल्याने आयुष्यात फक्त दु:खच मिळेल. जुन्या गोष्टी सोडून वर्तमान हाताळा आणि भविष्य सुधारण्यासाठी काम करा.

वाईट मार्गाने पैसे कमवू नका

आचार्य चाणक्या सांगतात कि, चारित्र्यभंग करून कमावलेल्या पैशाचा काही उपयोग नाही. यातना सहन करून कमावलेल्या पैशाची गरज नाही. पुण्य त्याग करून कमावलेला पैसा तुमचे कधीच कल्याण करणार नाही. ज्या पैशासाठी तुम्हाला शत्रूची खुशामत करावी लागते त्याचा काही उपयोग नाही.

Chanakya Niti : कोणत्या आहेत जगातील सर्वात मौल्यवान 4 गोष्टी, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

या पासून दूर राहा

काटे टाळण्यासाठी आपल्या पायात जोडे घाला आणि वाईट लोकांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना महत्व देणे बंद करा म्हणजे ते तुमच्यापासून दूर राहतील. तुमच्यावर हल्ला करण्याचे धाडस त्यांच्यात नाही राहणार.

लक्ष्मीची अवकृपा

आचार्य चाणक्य यांच्या मते, लक्ष्मी त्यांच्यापासून दूर जाते ज्यांचे दात स्वच्छ नाहीत, जे अस्वच्छ कपडे घालतात, जे भरपूर अन्न खातात, जे कठोर शब्द बोलतात, जे सूर्योदया नंतर उठतात. अशा व्यक्तीला लक्ष्मीची कृपा कधीच नसते, मग ते कितीही मोठे व्यक्तिमत्त्व असले तरी.

साक्षात्कार

ज्या व्यक्तीने चारही वेद आणि सर्व धर्मग्रंथांचे वाचन केले आहे आणि त्यांचे ज्ञान आहे, परंतु स्वत: च्या आत्म्याचा साक्षात्कार झाला नाही, तो माणूस त्या चमच्या सारखा आहे ज्याने सर्व प्रकारचे पदार्थ ढवळले आहेत. पण चव कोणी चाखली नाही.

दुर्बलतेचे प्रदर्शन करू नये

आचार्य चाणक्य सांगतात कि, साप विषारी नसला तरी तो फुसफुसणे सोडत नाही. तसेच कमकुवत दुर्बल व्यक्तीने कधी हि आपल्या दुर्बलतेचे प्रदर्शन करू नये.

About Leena Jadhav